Friday, April 18, 2008

"उरून राहता येतं!"

उरून राहता येतं !

हातात काठी आली म्हणून कुणी वृ ध्द होत नाही
वय लहान असूनही सर्वांना कुठे तरुण राहता येतं?

चांदणं आधी मनांत फुलावं लागतं अलगद्
मगच पौर्णिमेच्या चंद्राचं सौख्य पाहता येतं !

मनाचा गाभारा बुलंद असेल तरच दृष्टीचा फायदा
उगीचच का रवींद्र जैनच्या संगीतात सुरांना नाहता येतं?

कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर
रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं !

तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं
मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं !

येणार्‍या हर अनुभवांत काव्य दडलेलं असतं
हे समजणार्‍यालाच काव्य सराहता येतं !

कैफ दु:खाचाही असा बेधुंद असावा , की
चुकून आलंच कधी तर्.....सूख पण साहता येतं !

कुणाच्याही दु:खात आपले डोळे भरतातच
किती जणांच्या सुखात पण, अश्रूंना वाहता येतं?

स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला
तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!"

No comments: